भारत सरकारच्या मोफत पैसे देणाऱ्या योजना: जाणून घ्या विशेष माहिती

मित्रांनो, भारत सरकार तर्फे विविध योजनांच्या अंमलबजावणी करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये भारत सरकार तर्फे मोफत पैसे आपल्याला दिले जातात. हे पैसे काही योजनांच्या मार्फत दिलेले आहेत. या योजनांची माहिती सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत.

 

की जा मध्ये आपल्याला कोणकोणत्या योजना मार्फत हे पैसे मिळतात व ते कशाप्रकारे या योजनांचा लाभ घेण्यासाठी आपण काय केले पाहिजे? तसेच आपल्याला तसेच सर्वसामान्य माणसांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे? याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

 

जे लोक कोणत्याही संस्थेत किंवा कोणत्याही कंपनीमध्ये काम करत नाही किंवा त्यांच्यावर पीएफ जमा होत नाही असे लोक. म्हणजे पेंटर, सुतार, प्लंबर, वेल्डर इ. ते कार्ड म्हणजे ‘ई श्रम कार्ड’ हे कार्ड काढल्यामुळे सरकारला यातील युनिव्हर्सल अकाउंट नंबर मिळतो. या नंबर द्वारे त्या व्यक्तीची माहिती सरकारला मिळते. जर महामारी आली, दुष्काळ पडला असेल किंवा महापूर आला असेल अशा अपत्यकालीन परिस्थितीमध्ये जर अशा व्यक्तींना कोणत्याही रोजगार उपलब्ध नसतात.

 

त्यावेळी अशा लोकांसाठी सरकार त्यांच्या बँक अकाउंट वर डायरेक्ट पैसे ट्रान्सफर करते. की ज्यातून ते व्यक्ती आपल्याला रोजगार मिळू शकतील. हे कार्ड आपण आपल्या मोबाईलच्या साह्याने देखील काढू शकता. eshram.gov.in या लिंक द्वारे हे कार्ड काढता येऊ शकते. त्याचबरोबर या कार्डमुळे आपल्याला इतर योजनांचा लाभ देखील घेण्यास मदत मिळते व ह्या कार्डच्या साह्याने आपण जॉब देखील मिळू शकतो.

 

दुसरीची स्कीम आहे ती म्हणजे प्रधानमंत्री स्किल डेव्हलपमेंट योजना /कौशल्य विकास योजना. याद्वारे आपण आपल्याला करता न येणारे म्हणजे आपल्याला पैशाच्या अभावी कोणता तरी कोर्स करता आला नाही तर तो आपण या द्वारे करू शकतो. या योजनांच्या अंतर्गत आपल्याला कम्प्युटर ट्रेनिंग, ग्राफिक डिझाईन, प्रोग्रॅमिंग असा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस शिकवले जातात.

 

या योजनेच्या अंतर्गत जर आपण कोर्स केले तर कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पैसे दिले जातात. हा कोर्स पाच ते सहा महिन्यांचा इतका असतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर सरकार आपल्याला एक सर्टिफिकेट देते. त्याचबरोबर ते पाच ते दहा हजार रुपये रक्कम देखील सरकार आपल्याला देत असतो. कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला याद्वारे जॉब देखील मिळू शकतो. या कोळसाच्या अंतर्गत काही कंपन्या न जोडलेले आहे त्या कंपनीमध्ये आपल्याला जॉब देखील मिळू शकतो.

 

तिसरी योजना जी आहे ती म्हणजे स्टार्ट अप इंडिया. स्टार्टअप इंडिया हा भारत सरकारचा एक प्रमुख उपक्रम आहे. ज्याचा उद्देश देशातील स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण कल्पनांसाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे आहे, ज्यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल आणि मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

 

स्टार्टअप इंडिया हे स्टँडअप इंडिया आहे. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनी 2015 च्या भाषणात केली होती. देशातील तरुणांना मदत करण्यासाठी मोदी सरकारची ही एक प्रभावी योजना आहे.

 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना उद्योगपती आणि उद्योजक बनण्याची संधी देण्यासाठी हा पुढाकार घेतला आहे. ज्यासाठी स्टार्ट-अप नेटवर्क स्थापन करणे आवश्यक आहे. स्टार्ट-अपचा अर्थ बँकांद्वारे देशातील तरुणांना वित्तपुरवठा करणे हा आहे जेणेकरून ते चांगल्या ताकदीने सुरुवात करू शकतील जेणेकरून ते भारतात अधिक रोजगार निर्माण करू शकतील. याद्वारे महिला देखील विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांना देखील वित्त पुरवठा केला जातो.

 

अशाप्रकारे या काही तीन योजना आहेत की ज्या अंतर्गत आपल्याला सरकार पैसे देत असते. त्याद्वारे आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय देखील सुरू करू शकतो.