१०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; पोस्ट लाइफ इन्श्युरन्समध्ये भरती; अर्ज कसा करावा?

१०वी पास तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता टपाल विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. टपाल जीवन विमामध्ये भरत सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

 

या नोकरीबाबतची जाहिरात टपाल विमाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

 

पोस्टल लाइफ इन्श्युरन्समधील या नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला जाहिरात वाचायची आहे. अभिकर्ता पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर दिली आहे.

 

पोस्टल लाइफ इन्श्युरन्समधील या नोकरीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ ते ५० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

 

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याचसोबत अर्जदाराला विमा क्षेत्रात कामाचा अनुभव असावा. मुंबई येथे नोकरीचे ठिकाण असणार आहे.

 

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे. १ जुलै रोजी ही मुलाखत होणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो घेऊन यायचे आहे. उपनिदेशक (टपाल जीवन विमान विभाग), मुख्य कार्यालय, मुंबई-४००००१ येथे पाठवायचा आहे.

 

चांगल्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. १०वी पास असाल तर लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना चांगला पगार मिळणार आहे.