बारावी पास महिलांसाठी अंगणवाडी भरती सुरू ; असा करा अर्ज 

मध्यप्रदेश राज्यातील महिला व बालविकास विभागामार्फत(opportunity)आंगणवाडी सेविका आणि आंगणवाडी मदतनीस या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण १९,२०३ पदांवर निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. ग्रामीण भागातील महिला उमेदवारांसाठी ही एक अत्यंत उत्तम संधी आहे, विशेषतः अशा महिलांसाठी ज्या शिक्षणानंतर स्वतःच्या पायावर उभं राहून कुटुंबाला आधार देऊ इच्छितात.

 

“घाई करा नाही तर संधी मुकेल” AADHAR चा घ्या आधार! डायरेक्ट नोकरी

या भरतीच्या माध्यमातून आंगणवाडी सेविका पदासाठी २७२७ जागा उपल्बध असून त्यांना भर लावण्यात येणार आहे. तर आंगणवाडी मदतनीस १७,४७६ पदं भरण्यात येणार आहेत. ही भरती ग्रामीण भागात चालवण्यात येणाऱ्या विविध आंगणवाडी केंद्रांसाठी आहे.

 

 

या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक महिलांना काही शैक्षणिक निकष आणि शर्ती पात्र करणे महत्वाचे आहे. एकंदरीत दोन्ही पदांसाठी १२वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.(opportunity) कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून १२वी उत्तीर्ण असलेली महिला अर्ज करू शकते. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात, तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु या भरतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि महिला उमेदवारांना ५ वर्षांची सवलत दिली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नियमानुसार वेतन दिलं जाईल. यामध्ये नियमित मानधन, भत्ते आणि इतर सुविधा लागू होतील.

 

 

अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹१००/- निश्चित करण्यात आले आहे. हे शुल्क ऑनलाइन पद्धतीनेच भरावे लागेल. अर्ज करण्यासाठी mpwcdmis.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. उमेदवारांची निवड गुणांकन यादी आणि मुलाखत यांच्या आधारे होणार आहे. मुख्य म्हणजे कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. केवळ शैक्षणिक पात्रतेच्या आधारे गुणवत्तेनुसार निवड होईल.

 

 

भारतीय वायुदलात भरतीच्या संधी! ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

२० जून २०२५ पासून या भरतीला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने घेतली जात आहे. (opportunity)त्यामुळे अर्ज करणाऱ्या महिलांनी योग्य कागदपत्रे तयार ठेवावीत: जसे की शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्षरी इत्यादी. ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती भरणं अत्यावश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.