1500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार? त्यासाठी काय करावे लागणार : वाचा सविस्तर माहिती

मित्रांनो, राज्यचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प मांडलं. यामध्ये महिल्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यातलीच एक योजना आहे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण.’ या योजनेतून राज्य सरकार महिलांना आर्थिक मदत करणार आहे. अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केल्यानंतर शासन निर्णय ही जाहीर करण्यात आला आहे. शासन निर्णयात या योजनेचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो, यासाठी कोण आहे पात्र, याचे काय आहेत नियम आणि अटी? याबद्दल सावितर माहिती देण्यात आली आहे. याचबद्दल आपण अधिक माहिती आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. 

FD पेक्षा सुरक्षित आणि FD पेक्षा जास्त परतावा कुठे मिळेल ?

महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे. त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे. राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे.राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे.महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा. अशा प्रकारे योजना चालू करणारा मुख्य उद्देश आहे.

SBI क्रेडिट कार्ड कसे काढावे? वाचा सोपी व सविस्तर माहिती : SBI Credit Card

योजनेच्या पात्रता म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे. अशाप्रकारे या योजनेच्या काही पात्रता आहेत.

या योजनेअंतर्गत आपात्र कोणाकोणाला ठरवले जाईल ते आपण जाणून घेऊया.ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत 2/9 आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे.ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे. ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत

Personal Loan : जलद कर्ज मंजुरी, उत्पन्नाच्या पुराव्याची गरज नाही : संपूर्ण माहिती

योजनेचा लाभ मिळण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत.योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज. लाभार्थ्याचे आधार कार्ड. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य).बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.पासपोर्ट आकाराचा फोटो. रेशनकार्ड.

सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. इत्यादी कागदपत्रांच्या आवश्यकता लागेल.

या योजनेचा अर्ज तुम्ही कोणत्याही महा-ई-सेवा केंद्रातून किंवा ऑनलाईन फॉर्म भरल्या जाणाऱ्या ठिकाणी केला तरी चालू शकेल. त्याच बरोबर हा अर्ज तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून यासाठी कोणताही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही. फक्त हा अर्ज करत असताना तुम्ही तिथे असणे आवश्यक आहे. कारण यामध्ये ई केवायसी केली जाते. म्हणून ज्या व्यक्तीचा फॉर्म भरत आहे ती व्यक्ती असणे खूप गरजेचे आहे. या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच केला जात जाणार आहे कोणताही अन ऑफलाइन पद्धतीचा फॉर्म यासाठी उपलब्ध नाही.

शेतकऱ्यांना 1.5 लाखांचे कर्ज: विनातारण ‘या’ ॲपद्वारे personal Loan

अशाप्रकारे ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.