महिलांसाठी महालक्ष्मी योजना, दर महिना 3000 रुपये देणार ; 

मित्रांनो आजकाल सरकार अनेक वेगवेगळे योजना राबवत आहेत त्यामध्येच आणखीन एका योजनेची भर झालेली आहे ती म्हणजे महालक्ष्मी योजना विधानसभा निवडणुकीत आमचे राज्य आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी मोठी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेले आहे महिलांच्या सुरक्षितेची काळजी घेऊ अशी ग्वाही सुद्धा नाना पटवले यांनी दिलेले आहे मुलाखतीत ते बोलत होते की बहिणींना पैसे मिळावे हीच काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलेले आहे. 

Home loan : आता मुकेश अंबानी ही देणार होम लोन : वाचा सविस्तर

 

नाना पटोले म्हणाले, आम्ही लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलं आहे. फक्त ती कायम राहावी अशी आमची इच्छा आहे. महिलांना त्रास होऊ नये, बँकेत जमा झालेले पैसे कट होऊ नये. आता हे लोक इव्हेंट करत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट करत आहेत. प्रसिद्धीसाठी इव्हेंटवर या सरकारने ४७० कोटी रुपये खर्च केले. पण भगिनींना बँकेत किती त्रास होत आहे.

Personal loan : उत्पन्नाचा पुरावा नको, आणि अर्जंट कर्ज हवे असेल तर ‘हे’ वाचा आत्ताच: महत्वाची माहिती

हे या सरकारला माहीत आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. राज्यात आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणू, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांना ३००० रुपये देऊ, इतकंच नव्हे तर दरवर्षी या रकमेत १००० रुपयांची वाढ करू अशी मोठी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.

Credit Card Loan : पशुसंवर्धन कर्ज रु. 3 लाख: वापरा पशु किसान क्रेडिट कार्ड : सविस्तर माहिती

दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार कोर्टात गेले असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, त्यावरही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनिल वडपल्लीवार आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले. सदावर्ते जसा फडणवीस यांच्यासाठी काम करतो.

Snapmint Personal Loan app : फक्त आधार कार्ड, पॅन कार्डवर कर्ज देणारा नवा मार्ग : अर्जेंट पैसे मिळतात

मी नाव नाही घेत. फडणवीस म्हणतात ना, मी कुठे गेलो कोर्टात .तो माझा माणूस नाही असच फडणवीस म्हणतात ना. हा वडपल्लीवार आमच्या मंत्र्याचा पीएस होता. पीएस कोणीही राहू शकतो. फडणवीस यांचेही अनेक पीएस आहेत. ते पक्षाचे कार्यकर्तेच नाहीत, मग त्यांनी असं काही केलं तर फडणवीस जबाबदारी घेणार का? घेणार का जबाबदारी?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.